Tuesday, July 19, 2011

व्वा मुंबईकर व्वा!!!

व्वा मुंबईकर व्वा!!!

दि: १३/०७/२०११ - मुंबईवर दहशतवादी हल्ला!!!
झवेरी बाजार, ऑपेरा हाउस आणि दादर या तिन्ही ठिकाणी सुमारे ११-१२ मिनिटात ३ विस्फोट झाले. नेहमी प्रमाणे मृत आणि इजाग्रस्तांची संख्या कमीच!वृत्त वाहिन्यांना "ब्रेकिंग न्युज" मिळाली. आणि ठळक बातम्या अशा प्रकारे होत्या:
"मुंबई पुन्हा एकदा, बॉम्ब विस्फोटाने हादरली!!!"
"मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा हल्ला!!!"
मुख्यमंत्र्यांचे जनतेला आश्वासन, "शांतता बाळगा. परिस्थिती नियंत्रणात आहे" (मुंबईची परिस्थिती नक्की कोणाच्या नियंत्रणात आहे हे मात्र समजले नाही.)
विरोधी पक्षांचे, सरकारवर आक्षेप गोळे फेकणे सुरु झाले. (सुवर्ण संधी कोण गमवणार हो!!)

भयभीत झालेल्या लोकांची पळापळ सुरु झाली. घराबाहेर असलेल्या लोकांच्या घरी, त्यांचे परिवारवाले चिंतातूर होऊन टि.व्ही. वर "ब्रेकिंग न्युज" पाहू लागले. मनात एक भीती बाळगून, कि आपला माणूस तर सुखरूप असेल ना?


दि: १४/०७/२०११ - बॉम्ब विस्फोटाच्या दुसर्या दिवशी
माणसे आप आपल्या कामावर निघालीत. मुले, स्कूल आणि कॉलेज ला जाऊ लागले. रस्त्यावर फेरीवाले, रिक्षा, टेक्सी, बस, लोकांची वर्दळ, सर्व काही सुरळीतपणे सुरु झालं. वाटत होतं जणू काल संध्याकाळी काही घडलंच नाही! पुन्हा वृत्त वाहिन्या झळकू लागल्या. पण आजचा मसाला जरा वेगळा होता:
"मुंबईचे जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झाले"
"मुंबईकरांच्या धाडसीपणाला आमचे सलाम"

पण खरंच आपण आपल्या ह्या अश्या वागणुकीसाठी प्रशंसापात्र आहोत? तुम्हाला हि वाटतं का, कि कुणीतरी आपली पाठ थोपटून आपल्याला "शाब्बास" असे म्हणावे, हे असले क्रौर्य सहन करत राहण्यासाठी??म्हणजे काही असामाजिक तत्वांनी आपल्या घरात येऊन आपल्याला त्रास द्यावा, घराची नासधूस करावी आणि मग निघून जावे. मग आपण गप्प राहून आपलं घर पुन्हा सावरायचं, ते सुद्धा कसलीही तक्रार न करता!!! अहो, यात कसलं आलंय धाडस???हे फक्त प्रसार माध्यम व राजनैतिक पक्षांचे जनतेला गप्प करण्यासाठी वापरले जाणारे तोडगे आहेत. मुंबईकरांच्या धाडसीपणाच्या नावाखाली हे बेलगाम नेते व मंत्री आपले ढुंगण झाकून घेतात. म्हणजे एका स्त्रीचा बलात्कार झाल्यानंतर तिला विचारायचं कि "तुला कसं वाटतं? हि घटना तुझ्यासाठी कितपत दु:खद होती??" आणि मग तिच्या अब्रूची लक्तरं वेचून बाजारात त्यांचा लीलाव करावा!!!

हल्लीच्या काळात कुठलीही वस्तू विकत घेतली तर त्यावर "WARRANTY" मिळते. पण ज्यांच्या आधारे संपूर्ण कुटुंबाचे निर्वाह होत असेल, अश्या लोकांचं काय?? काहीच नाही. कारण, सकाळी घरातून कामावर गेलेला माणूस संध्याकाळी परतणार कि नाही, याची खात्री न त्याला असते न त्याच्या घरच्यांना!

आज एक सर्व सामान्य माणूस, सामान्य जीवन जगताना एवढा भयभीत का आहे?? किंवा, आपल्या देशामध्ये फक्त नामवंत आणि राजकीय लोकांच्या प्राणाचे मोल आहे आणि आपण किडे-मुंग्या???

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. पण भारतातील जनता आज हि गुलाम आहे!! कारण गुलामांना सर्व काही (यातना) सहन करत राहायची सवय असते आणि तेच आपण करत आहोत! यासाठी आपल्याला "सलाम" आणि "शाबासकी" मिळाली पाहिजे का??

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बालगंगाधर टिळक अश्या अनेक वीर, स्वाभिमानी लोकांचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला, त्याच महाराष्ट्राच्या लाडक्या शहर मुंबईची आज काय अवदशा झाली आहे. याला जवाबदार कोण???

अजून किती विस्फोट होतील? अजून किती निर्दोष लोकांचे जीव जातील? कधीपर्यंत आपलं प्रशासन, सरकार व कायदा व्यवस्था एक नपुंसकाची भूमिका बजावत राहणार आणि निर्दोष जनतेच्या जीवावर उठणार?? हे सर्व कधी थांबणार???

पण आपल्याला काय, आपण खूप धाडसी आहोत. किती ही घातक हल्ले होऊ दे, किती ही लोकांनी आपले जीव गमवू दे, आपण सगळं विसरून स्वस्थपणे आपले जीवन पुन्हा सुरळीत करायचे प्रयत्न करू.


खरंच या धाडसाचं अभिमान वाटलं पाहिजे कि लाज!!!


_________ देवेन्द्र बी. लावंत्रा

Tuesday, May 31, 2011

स्मरशील तू .....

आयुष्याच्या या वळणावर
कधीतरी भेटशील तू .
मौन धारण केलेस जरी तू तेव्हा,
कित्येक गोष्टी नजरेने सांगशील तू.

तुला दिलेले वचन मी,
अजूनही पाळतो आहे,
एकांत या ह्रुदयात माझ्या,
नेहमी प्रिये राहशील तू.

एवढे वचन दे आज साजणे,
स्मृतित तुझ्या मला ठेवशील तू.
नसेन मी या जगात जेव्हा,
कधीतरी मला स्मरशील तू.....
___________देव

Tuesday, June 8, 2010

दमलेल्या बाबाची कहाणी

दमलेल्या बाबाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परी राणी,

उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी (२)

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत

निजतंच तरी पण येशील खुशीत

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

आट-पाट नगरात गर्दी होती भारी

घामाघूम राजा करी लोकलची वारी (२)

रोज सकाळीस राजा निघताना बोले

गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले

जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परी येणार मी वेळेतच घरी

स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी

खऱ्याखुऱ्या पारीसाठी गोष्टीतली परी

बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

ऑफिसात उशिरा मी असतो बसून (२)

भंडावले डोके गेले कामात बुडून (२)

तास–तास जातो खाल मानेने निघून (२)

एक-एक दिवा जातो हळूच विझून (२)

अशावेळी काय सांगू काय काय वाटे (२)

आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे (२)

वाटते कि उठुनिया तुझ्या पास यावे (२)

तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे

उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी (२)

चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत खिदळत बोलशील काही

बघताना भान मला उरणार नाही (२)

हसूनिया उगाचच ओरडेल काही

दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा

क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई (२)

मउ-मउ दुध भात भरवेल आई (२)

गोष्ट ऐकायला मग येशील न अशी (२)

सावरीच्या उशीहून मउ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही

सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही

जेऊ, खाऊ, न्हाऊ, माखू घालतो ना तुला

आई परी वेणी फणी करतो ना तुलाऽऽऽऽऽऽऽऽऽ

जेऊ, माखू न्हाऊ, खाऊ घालतो न तुला

आई परी वेणी-फणी करतो ना तुला

तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा

तो हि कधी गुपचूप रडतो रे बाळा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची या कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

बोल्क्यामध्ये लुक-लुक्लेला तुझा पहिला दात (२)

आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मउ भात

आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा (२)

रांगत-रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा (२)

लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाउल पहिलं (२)

दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून (२)

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशिराला येतो

बालपण गेले तुझे गुज निसटून

उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे

नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं (२)

सासुर्याला जाता-जाता उंबरठ्या मध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये....

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ

Saturday, June 5, 2010

Superb Lyrics Of Lallati Bhandaar From Marathi Movie Jogava

नमस्कार मित्रांनो,
मी आपल्या सर्वांसाठी सादर करीत आहे, मराठी चित्रपट जोगवा या मधील गोंधळ - लल्लाटी भंडार..... या गाण्याचे बोल मराठी font मध्ये. आशा आहे आवडल्यावर आपला प्रतिसाद मिळेल.

धन्यवाद


लल्लाटी भंडार

नदीच्या पल्याड, आईचा डोंगर (२)

डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर (२)

घालू जागर जागर, डोंगर माथ्याला (२)

हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार

आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)

नदीच्या पाण्यावर, आन्गीण फुटत (२)

तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत (२)

नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंग्राला (२)

हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार

आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)

नवसाला पाव तू, देवी माझ्या, हाकला धाव तू

हाकला धाव तू, देवी माझ्या, अंतरी रहावं तू

देवी माझ्या, अंतरी रहावं तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू

काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून, तुझी मुरत पाहीन

मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन

महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन

घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन

दृष्ट लागली लागली, हळदीच्या अंगाला (२)

हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार

आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर

निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं

पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर

आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर

खनं नारळानं, ओटी मी भरीन

ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन

सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन

देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन

आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला

आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला

हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार

आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर

निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं

पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर

आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर

Friday, March 26, 2010

एक निवेदन,
दोस्तों मेरा नया blog,
www.mushaayara.blogspot.com ज़रुर देखें और अपने अभिप्राय भेजे.

धन्यवाद